मुंबई महानगरीत सायबर क्राईम मध्ये 243 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई सायबर गुन्ह्याचा आकड्यात मात्र खूप जास्त वाढ झाली आहे सायबर गुन्ह्याची संख्या १३७५ वरून तर 3723 पर्यंत वाढीसाठी आहे आकडेवारीनुसार 2018 ते 2022 या कालावधीत सायबर गुन्ह्यांमध्ये 243 टक्क्यांनी वाढ झाली आहे पण या गुन्हा मध्ये आरोपी सापडल्याचे प्रमाण फक्त 8 टक्के आहे.
आकडेवारीवरून सायबर गुन्ह्यात चिंताजनक वाढ
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरीत सायबर क्राईम सुमारे 2018 मध्ये 1375 सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ते 2022 मध्ये सायबर गुन्ह्यामध्ये 4723 एवढी वाढ झाली यात सगळ्यात मोठी फसवणूक क्रेडिट आणि डेबिट कार्ड मध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. 2018 मध्ये 461 गुन्हे तर 2022 मध्ये 3490 इतके पोहोचले आहेत.
सायबर गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण फक्त 8 टक्के
मुंबई सायबर क्राईम मध्ये गुन्हेगाराची सापडण्याचे प्रमाण फक्त 8 टक्के इतकी आहेत. 2018 मध्ये 1375 सायबर क्राईमची नोंद करण्यात आली. तर 2022 मध्ये सायबर क्राईम मध्ये तब्बल 4723 एवढी वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त फसवणूक क्रेडिट आणि डेबिट मध्ये झाली आहे, आणि महिला अत्याचारातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
या दहा-बारा वर्षात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्हा मध्ये 131 टक्के आणि 105 टक्के वाढ झाली आहे. सायबर सेक्युरिटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे प्रमाण दिसत आहे .सायबर गुन्हेगारांना आहे अनेक नव्या पद्धतीने गुन्हे करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे समोर येत आहे .
बनावट ॲपपासून दूर राहण्याचा सल्ला क्विक हिलकडून देण्यात आला आहे. या ॲपएप्लीकेशनमुळे गुगल किंवा फेसबुक, जीपीएस लोकेशन्स ट्रॅक करणे, रेकॉर्डिंग करणे आणि हिडन सर्व्हरवर डेटा ट्रान्समिट करणे यासारखी माहिती चोरण्याची जास्त शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे आपली स्वतःची माहिती अशा एप्लीकेशन मुळे वापरताना सांभाळून वापरण्याचे सल्ला देखील क्विक हिलकडून करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगारी ही वाढत चाललेली असून . यावर कठोर निर्णय घेणे खूप गरजेचे भाग आहे. तर यावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात येत आहे. तर ऑनलाईन गेमिंग सारखे प्लॅटफॉर्म्स वापरताना users देखील काळजी घ्यावी असं देखील. क्विक हील कडून सांगण्यात आलं आहे.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles